वृक्षवल्ली
चालता चालता माझं शीर एका झाडाला धडकलं,
लावता हात डोक्याला बंध वहाणेचं निसटलं..
क्षणात पडणार तेवढ्यात एका फांदीनं पकडलं,
चार टकोरी टोळक्यात इज्जतीत मात्र वाचवलं !
क्षणभराच्या ओळखीत मनामनांच हितगूज जुळलं,
थोडं बोलावं म्हणून माझं मन तिथंच घुटमळलं..
आता झाडयाशी का कोण बोलतं ? असं खुद्द झाडालाच वाटलं..
बोलघेवड्या पोरट्याला त्यानं इशाऱ्यातच ईचारलं.
होतंच मूळी ते वटवृक्ष डेरेदार आणि बहरलेलं,
माझ्या दिलखुलास गप्पांनी ते 'देखणं' नकळत शहारलं..
बस कर लाजू नकोस असं बोलणार तरी कसं..?
माजलेल्या मानवी पाश्यामुळे ते बिचारं एका फांदीसह कोसळलं .
"किती ओरबडतो तुला आम्ही,दुखत नाही का कुठं ?"
"दुखलेलं मन ऐकून घ्यायला ,तुम्ही लोक कधी येता का इथं..?"
"कधी फळं, कधी फुलं तर कधी चंदनाचं खोड,"
"गरजेनुसार सगळेच करतात आमची तोडातोड ."
"खूप शिकवतात शाळेत तुम्हाला झाडं जगवायला,"
"पण शिकलेलीच लोकं मात्र पुढे असतात मुळासकट उखडायला !"
"अशिक्षित तुम्ही कि जंगलाचे वनवासी..?"
"कृतज्ञता व्यक्त करतात 'चिपकून' माझ्या उराशी!"
अबोल झालेल्या उद्यानात अश्रू नकळत ओघळले,
आसवे गाळत दोघे जीव मनातून पाघळले..
कळत्या झालेल्या मैत्रीमध्ये मनमुराद मारली मिठी,
एका वेगळ्याच नात्यांची जुळली प्रेमळ प्रिती !
©सुजित @ NRN Garden ,22:36

Comments
Post a Comment